नागरीक मी भारत देशाचा

नुकतेच वाचलेले ढकलपत्र बोलके आहे.
*नागरीक मी भारत देशाचा*
*हातात सगळं आयतं पाहिजे !*

वीज कधी वाचवणार नाही
बील मात्र माफ पाहिजे !
झाड एकही लावणार नाही
पाऊस मात्र चांगला पाहिजे !

तक्रार कधी करणार नाही
कारवाई मात्र लगेच पाहिजे !
लाचेशिवाय काम करणार नाही
भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे !

कचरा खिडकीतून बाहेर टाकीन
शहरात मात्र स्वच्छता पाहिजे !
कामात भले टाईमपास करीन
दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे !

धर्माच्या नावाने भले काहीही करीन
देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे !
मतदान करताना जात पाहीन
म्हणेल, जातीयता बंद झाली पाहिजे !

कर भरताना पळवाटा शोधीन
विकास मात्र जोरात पाहिजे !
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं आयतं पाहिजे !

This entry was posted in मनातलं and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.